Skip to content
May 13, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Reporter News

Reporter News

Today's News Tomorrow's Future

Primary Menu
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Live
  • Home
  • ‘नैतिकतेची लढाई गांधी विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’ : खा.सुळे
  • Marathi News

‘नैतिकतेची लढाई गांधी विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’ : खा.सुळे

admin January 30, 2025
‘नैतिकतेची लढाई गांधी विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’ : खा.सुळे
Views: 123
0 0
Spread the love
           

Read Time:7 Minute, 3 Second

पुणे:  राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गुरुवार,दि.३० जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी साडेआठ वाजता सामुदायिक प्रार्थना,भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.खासदार सुप्रिया सुळे, गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, अॅड.अभय छाजेड,एम.एस.जाधव, अन्वर राजन, डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

खा.सुळे यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला.

 

 

संदीप बर्वे,धनंजय पवार, मोहिनी पवार, बाबालाल बिडीवाले,अभय देशपांडे यांनी भजन गायन केले.सभागृहात प्रा.रमा सप्तर्षी,डॉ.सुनील जगताप,विकास लवांडे, अॅड.स्वप्नील तोंडे, दत्ता बाळसराफ, अॅड.राजेश तोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली .या सभेनंतर ‘गांधीजी आणि सहिष्णुता’ या विषयावर माजी साहित्य संमेलनाध्यक्ष तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .हे कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे पार पडले.

 

नैतिकतेची लढाई गांधी विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’ : खा.सुळे

…………….

 

प्रार्थनेनंतर बोलताना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या,’ महात्मा गांधी पुढील पिढीला कळले पाहिजेत,नव्या पिढीला त्यांच्या भाषेत पोहोचवले पाहिजेत.त्यांचा किमान एक गुण अंगात बाणवला पाहिजे.प्रार्थना ही वैय्यक्तिक बाब आहे.तशीच राहिली पाहिजे.आजही देशाला गांधी, विनोबांच्या विचारांची गरज आहे.

 

कॉ. गोविंद पानसरेंचे खुनी जामीनावर सुटलेत. गौरी लंकेश, डॉ.दाभोळकर यांच्या बाबतीत काय झाले,हे आपण पाहिले आहे.श्रद्धा जरूर असावी, अंधश्रध्देने सर्वांचा नाश होतो, महिला मागे पडतात.आमची श्रध्दा पांडुरंगावर आहे,त्यांच्या आणि आमच्या भेटीत आम्हाला मध्यस्थ लागत नाही.

 

 

सद्यस्थितीवर बोलताना खा. सुळे म्हणाल्या,’कै.संतोष देशमुख यांच्या मुलीचे अश्रू बघवले नसते. आज काही जणांच्या मांडीला मांडी लावून बसू शकलो नसतो.पक्षाचे विभाजन झाले, हे बरेच झाले.आता सत्ताधारी म्हणतात,आम्हाला नैतिकता शिकवू नका. देशात,राज्यात वातावरण अत्यंत बिघडले आहे.नैतिकतेची ही लढाई सातत्य ठेवून, विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’.

 

 

गांधी विचार प्रसाराचा खा.सुप्रिया सुळे यांचा संकल्प

…………………………………..

 

खा.सुळे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला.त्या म्हणाल्या,’गांधी भवन ही वास्तू प्रत्येक पुणेकराचे घर,माहेर झाले पाहिजे. माझ्याशी संबंधित शाळांमध्ये,रयत शिक्षण संस्थेत गांधीजींच्या प्रार्थना होतील,याचा मी प्रयत्न करणार आहे.

 

वर्षातून गांधी भवन येथे ६ कार्यशाळा घेऊन गांधी विचाराचे १ हजार कार्यकर्ते घडवले पाहिजेत,असा संकल्प खा.सुप्रिया सुळे यांनी केला.दत्ता बाळसराफ,विकास लवांडे यांच्यावर नियोजनाची जबाबदारी दिली.या कार्यशाळांना खा. सुळे उपस्थित राहणार आहेत.

 

 

गांधीजींचे न ऐकता शहरात येऊन आपण शहरे बकाल केली आहेत.गांधी, नेहरूंचे सायंटिफिक टेंपर, विज्ञानविचार आचरणात आणले पाहिजेत. संविधानाच्या चौकटीत राहून समाजात बदल घडवले पाहिजेत, असेही खा. सुळे यांनी सांगितले.

 

प्रत्येक पायरीवर स्वार्थाची चेंगराचेंगरी : डॉ. सप्तर्षी

………..

 

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले’, गांधीजींच्या प्रार्थना हे बीजारोपण आहे.त्यांचे स्मरण हे राष्ट्रपित्याचे स्मरण आहे. गांधीजींनी आयुष्यात कधीही प्रार्थना चुकवल्या नाहीत. गांधींजींचा खून करणारा खुनी पुण्यातील उच्चकालीन असणे हा निव्वळ योगायोग नाही.त्यामुळेच महाराष्ट्रात,पुण्यात गांधी विचार जिवंत ठेवला पाहिजे.गांधी स्मारक निधीची स्थापनाच या उद्देशाने झाली आहे. गांधी विचारांचे बीज आम्ही सांभाळून ठेवले आहे.त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

 

महाराष्ट्रात प्रत्येक पायरीवर नवीन मंत्रीमंडळ एकमेकाशी भांडत आहे. मंत्रीपद, पालकमंत्री पदासाठी चेंगराचेंगरी होत आहे. कारण पालकमंत्री झालो नाही,तर मोक्ष मिळणार नाही,अशी त्यांना भीती वाटते,अशी टीका डॉ. सप्तर्षी यांनी केली. बंधूभाव असणारे हे राष्ट्र गांधीजींनी घडवले. मगच प्राण सोडले.ज्यांना हिंदूराष्ट्र हवे होते,त्यांनी ते ब्रिटिशांविरुद्ध लढून का मिळवले नाही, असा सवालही डॉ. सप्तर्षी यांनी केला.

Share

Pinterest
LinkedIn
Avatar

About Post Author

admin

https://reportertodaynews.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %

Spread the love
           

Continue Reading

Previous: INCCOM-19 Kicks Off in Pune: A Celebration of Innovation in Composite Technologies
Next: National-Level Meeting Held in Pune to Improve Animal Husbandry and Dairying Statistics

Related Stories

भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन – ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू
  • Marathi News

भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन – ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू

admin May 12, 2025
महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • Marathi News

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 

admin May 12, 2025
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • Marathi News

अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?

admin May 11, 2025

Recent Posts

  • भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन – ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू
  • महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • 2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील

Recent Comments

  1. kalkylyator OSAGO_ovsn on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  2. FloydLex on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  3. Edgarduh on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  4. Trefipt on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  5. Diplomi_aiMl on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024

Categories

  • Bangali News
  • Contact Us
  • Defence News
  • English News
  • Hindi News
  • Kannada News
  • Marathi News
  • Uncategorized

You may have missed

भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन – ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू
  • Marathi News

भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन – ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू

admin May 12, 2025
महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • Marathi News

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 

admin May 12, 2025
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • Marathi News

अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?

admin May 11, 2025
2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • Marathi News

2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)

admin May 11, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.