
मुंबई – महिला सशक्तीकरण, स्त्री शिक्षण, समाज परिवर्तन आणि वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या राज्यातील सहा महिलांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत ही माहिती निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केली.
या पुरस्कारासाठी राज्याच्या सहा महसूल विभागांमधून प्रत्येकी एका महिलेला निवडण्यात आले आहे. सन २०२२-२३ या वर्षासाठी निवड समितीच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली.
पुरस्कारप्राप्त मान्यवर महिला:
पुणे विभाग – जनाबाई सिताराम उगले
नाशिक विभाग – डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी
कोकण विभाग – फुलन जोतीराव शिंदे
छत्रपती संभाजीनगर विभाग – मिनाक्षी दयानंद बिराजदार
अमरावती विभाग – वनिता रामचंद्र अंभोरे
नागपूर विभाग – शालिनी आनंद सक्सेना
पुरस्कारप्राप्त महिलांना रु. १ लाख आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्त्री शिक्षण आणि समाजपरिवर्तनाच्या दिशेने कार्य करणाऱ्या महिलांचा हा सन्मान प्रेरणादायी ठरणार आहे.