
पिसोळी, पुणे: जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारी संस्थेच्या पिसोळी येथील जगदंबा भवन केंद्रात एक विशेष ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले. पृथ्वी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व सकारात्मक ऊर्जा पसरवणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे ५० साधकांनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम जनक स्टेडियम येथे पार पडला. ध्यान सत्राचे मार्गदर्शन जगदंबा भवनच्या सह-संचालिका ब्रह्माकुमारी शीतल यांनी केले. त्यांनी सर्व साधकांना राजयोग ध्यान साधनेद्वारे आंतरिक शांती व सकारात्मक ऊर्जेचे प्रकंपन पृथ्वीमातेकडे पाठवण्यासाठी प्रेरित केले.
सत्राच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पृथ्वीचे रक्षण व संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. उपस्थित साधकांसाठी हा कार्यक्रम आध्यात्मिक उन्नतीचा तसेच पर्यावरणप्रेमाचा एक प्रेरणादायी अनुभव ठरला.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या या उपक्रमातून हे स्पष्ट होते की, आंतरिक सकारात्मकता आणि शांततेच्या माध्यमातूनही पृथ्वीच्या संवर्धनात मोलाचे योगदान देता येते.