
सर्रासपणे कार्टूनचा वापर, गाझातील जुने व्हिडिओ, सनसनाटी मथळे, मोदींचा फोटो वापरणे, बातमीचा सोर्स न सांगता फक्त बडबड करणे, कधी हेलिकॉप्टर मध्ये बसून स्टुडिओतला अँकर पाकिस्तानची सैर करतोय तर कधी स्वतःच सैनिक असल्यासारखा पाकवर हल्ला चढवतोय. त्यात ते कर्कश ओरडणं, कोणत्याही बातमीला ब्रेकिंग न्यूज, मोठी बातमी, आताची सर्वात मोठी बातमी म्हणणं हा सगळा प्रकार अत्यंत Cheap आहे.
पण माध्यमांची अवस्था इतकी वाईट कशी झाली?
हिंदी आणि प्रादेशिक माध्यमांत काम करणाऱ्या लोकांचा आर्थिक स्तर प्रचंड खराब आहे.
फक्त मोठेपणा, दिखावा यामुळे अनेक तिशीतले लोकं सुद्धा इथं 10-20 हजारांपासून काम करताना दिसतात. त्यामुळे इथे प्रचंड सुमार लोकांची भरती होते.
एकदा तुम्ही इखादा चॅनल वगैरे जॉईल केलं की तुम्हाला कुठलं ट्रेनिंग नसतं.
फक्त यायचं, 50 बातम्यांच्या बळजबरी 100 बातम्या करुन एक बुलेटीन तयार करून घरी जायचं.
कधी रिसर्च करायचा संबंध नसतो ना कधी फिल्डवर जावून एखादा BBC सारखा रिपोर्ट करता येतो.
या गोंधळात युद्धासारख्या गंभीर गोष्टींचं रुपांतर मनोरंजनात झालंय. नागरिक याला टीव्ही शोसारखं पाहतात.
जेवत, झोपत, अगदी टॉयलेटमध्ये बसूनसुद्धा. यात कोणतीही गंभीरता राहिलेली नाही, आणि याला जबाबदार आहेत ती माध्यमं ज्यांना खरंच ट्रेनिंगची गरज आहे.